सहानुभूती नको, आम्हाला हक्क द्या-श्रीगौरी सावंत

जिंतूर येथील कार्यक्रमाला प्रेक्षकांची अलोट गर्दी.
जिंतूर (अजमत पठाण)
समाजाने आम्हाला दूर लोटू नये, ही आमची अपेक्षा असून आम्ही सुद्धा समजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा. आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे, असे प्रतिपादन तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांनी केले त्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दि 7 जानेवारी रोजी दर्पणकार बाळासास्त्री जाभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘समाज आणि मातृत्व’ या कार्यक्रमात बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, अँड मनोज सारडा, प्रताप देशमुख, प्रिया देशमुख, सुरेखा टाले, वैभव वट्टमवार, डॉ देवराव कराळे, डॉ रविकिरण चांडगे, पत्रकार विजय चोरडिया, रत्नदीप कळमकर,किशोर देशपांडे,हरीश मुंदडा,धरमचंद अच्छा, रमेश दरगड, डॉ.विवेक थिटे, अँड गोपाळ रोकडे, सखाराम चिद्रवार,अरुण शहाणे, सुधीर शहाणे,देवेंद्र भुरे, सत्यनारायण शर्मा, जसपाल राउरी, पवन महेरिया, गोविंद थिटे, सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की तृतीयपंथी नागरिकांच्या पुनर्वसन बाबत राज्य व केंद्र सरकार काहीच करत नाही. राज्य सरकारने सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केले पाहिजे. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे. मुलं-मुलं असतात ती कुणाचीही असो त्यात त्यांचा काय दोष? ज्या महिला एकल पालक आहेत, त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. या महिलांना बाळंतपणासाठी नवऱ्याचे नाव नसल्याने अंनत अडचणीचा सामना करावा लागतो.
माझ्यासारख्याने किती टाळ्या वाजवायच्या आणि किती याचना करायच्या? पण मी मागे हटणार नाही. घेतलेला वसा मी पूर्ण करणारच. जाता जाता मी काय घेऊन जाणार आहे? आयुष्य ज्याला कळलं आहे, तो मदत करतो. मी एकटी या संस्थेची मालक नाही. दुसरी फळी मी तयार करते आहे. मी नसेल तर अनाथ, तृतीयपंथी मुलं रस्त्यावर पडता कामा नये. एकीकडे तृतीयपंथीयांचे सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. आता मी झाड लावलं आहे.
त्याचा वटवृक्ष व्हायला अजून अवकाश आहे. खरं तर अशा घराची आवश्यकताच नको; पण नाइलाज आहे. मला समाजापासून दूर नाही जायचे. ही सुरुवात आहे. समाजाने सगळ्यांना सामावून घ्यावं हीच इच्छा आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मो या शेख यांनी तर आभार संघाचे अध्यक्ष शेख शकील यांनी मानले.
या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला,नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमात शहरातील जेष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, निहाल अहमद, एम ए मजीद यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बोरीचे पत्रकार गजानन चौधरी यांची योग संघटनेच्या राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.